नवी दिल्ली : ‘जर मागण्या मान्य करायच्या नसतील तर सरकारने स्पष्ट सांगावे, त्यामुळे मागणी करणारे लोक विषय तरी सोडून देतील. देश चालविणाऱ्या सरकारला खोटे बोलणे शोभत नाही. जेव्हा सरकार अडचणीत येते, तेव्हा खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेते,’ असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.